साहित्यविश्वाचे शब्द
मान्यवरांच्या नजरेतून
डॉ. सलील कुळकर्णी
संगीतकार, दिग्दर्शक
“
डॉ. प्रज्ञा दया पवार
कवयित्री लेखिका
“
डॉ. सुरेश सावंत
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, विचारवंत
“
आशा पैठणे
लेखिका, कवयित्री
“
माणूस.. कवी.. पत्रकार.. !!
प्रसिद्ध कवी लेखक आणि समिक्षकांनी ‘काजळकाठ’ विषयी व्यक्त केलेले निवडक अभिप्राय
‘काजळकाठ’ नाव सुंदर आहे. यामिनीने स्वतःचा काव्यसंग्रह करण्याची घाई केली नाही, म्हणून विशेष कौतुक.
या कवितांमध्ये प्रेमाची सुद्धा जी कैक रूपं आहेत, त्यामध्ये पुरुषाच्या प्रतिमेला छेद देणाऱ्या कविता आहेत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. विद्रोही कवितांची, स्त्रीवादी कवितांचा पायरव या सगळ्या कवितेमध्ये ऐकू येतो.
‘काजळकाठ’ म्हणजे आतल्या कोलाहलाची कविता आहे. ही कविता वाचून मी खूप अस्वस्थ झालो. अस्वस्थतेचा वाचनानंद देणारी ही कविता मला अतिशय आवडली आहे! टोकदार जीवनानुभव आणि निरीक्षणे खूपच संयमितपणे मांडली आहेत.
यामिनीच्या रक्तात कविता अशीकाही मिसळली आहे की जनुकांची तपासणी केली तर फक्त गझल आणि कविताच सापडतील… सशक्त काव्याबीज असल्याशिवाय कविता उगवत नाही हेच खरे.. कविता क्षणाक्षणाला भावविभोर करते.
@ यामिनी दळवी, २०२६ - सर्व हक्क सुरक्षित